मंगळवार, १ मार्च, २०२२

माझ्या गावची जत्रा - सावरगाव रोकडा ता.अहमदपूर, जि.लातूर



लहानपणी महाशिवरात्री जशी जशी जवळ येऊ लागली की ओढ राहायची ती गावच्या जत्रेची.आमच्या गावात संत बापदेव महाराजांच्या मंदिरात दर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते व बालपणापासूनच जत्रे बद्दल खूप उत्सुकता राहायची. जत्रा जवळ येऊ लागली की पैसे जमवायचे व जत्रेच्या दिवशी मज्जा करायची हे दरवर्षी ठरलेलं असायचं.जत्रेच्या आदल्या दिवशी मस्त कुस्त्याचा फड रंगायचा पंचक्रोशीतील व बाहेरून अनेक कुस्तीपटू फडात यायचे.आमच्या गावचे पैलवान कै.मधुकर कोटंबे (मधु पहेलवान)म्हणून प्रसिद्ध कुस्तीपटू होते ,दर वर्षी कुस्तीत शेवटची  कुस्ती त्यांची असायची व ते दरवर्षी जिंकायचेच.कुस्तीचा फड काळ्या रानात गोल रिंगण करून भरायचा व गावातील अनुभवी माणसे हे पंच म्हणून फडात असायचे व अगदी आनंदी वातावरणात सायंकाळी दिवस मावळून झापड पडेपर्यंत कुस्तीचा डाव हलकीच्या तालावर रंगायचा हे लहानपणी बघायला खूप मजा यायची.दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जत्रा असल्याने झोप लागायचीच नाही, कधी सकाळ होते व जत्रेत जातो असं व्हायचं.सकाळी लवकर उठून बापूदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायच व मस्त मित्रांसोबत जत्रेत फिरायच.

त्यावेळी सर्वात जास्त आकर्षण असायचं ते रहाटपाळण्याचे,जत्रा सुरू होणार म्हटलं की चार दिवस आगोदर पासून लाकडी रहाटपाळणा गावात यायचा व शाळा सुटली की तो पाळणा फिटिंग कसा करतो तिथं पासून ते जत्रा झाल्यास दोन दिवसानंतर तो जाईपर्यंत त्याच्या सहवासात राहायचो. पूर्वी लाकडी रहाटपाळणा असायचा पाळणा सुरू झाला की त्याचा विशिष्ठ आवाज ऐकू आला की गावातील लहानमुले तिथे पळत पळत जमा व्हायचे व आनंद घ्यायचे.जत्रेत दुसरं आकर्षण म्हणजे डब्ब्यातील पिक्चरचे आपला एकडोळा बंद करून त्या छिद्रातून बघायचं व त्यात चलचित्र दिसायचं व तो डब्बेवाल त्या सिन प्रमाणे गाणे म्हणायचा हे लहानपणी खूप भारी वाटायचं.दिवसभर मित्रांसोबत जत्रेत फिरायचं घरी उपवास म्हणून साबुदाणा खिचडी,रताळे खायची व जत्रेत कांडे-बत्ताशे, शेव-भजीच्या दुकानासमोरून गेलो की खमंग वासाने तिकडे आकर्षित व्हायचो व  उपवासावर पाणी सोडुन मस्त शेव भज्यावर ताव मारायचा वरून मोसंबी खाऊन मस्त दिवस घालवायचा. आमच्या गावाला बापूदेवाच सावरगाव म्हणून ओळखले जायचं व सावरगावची जत्रा म्हटली की पंचक्रोशीतील लोक बैलगाडी,चालत जत्रेला यायचे व आनंद लुटायचे.पूर्वी गावच्या चोहीबाजूला नुसत्या बैलगाड्या दिसायच्या व त्या मोजण्यात खूप आनंद वाटायचा.सायंकाळ होत आली की जत्रा विरळ होत जायची व लोक आपआपल्या गावी व घरी परत जायचे तेंव्हा मन नाराज व्हायचं व अस वाटायचं की जत्रा आणखी कांही दिवस असावी. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना खूप निराश वाटायचं कारण काल ह्याच रस्त्याने जाताना अलोट माणसांची गर्दी असायची व आज तोच रस्ता मोकळा दिसायचा पण पुढील वर्षी जत्रा लवकर येणारच ह्या आशेने पटापट पावले टाकत शाळा गाठायची.

आज खूप वर्षांनी महाशिवरात्रीला गावी आलो होतो व जत्रेत फिरलो त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.कोरोनाच्या संकटामुळे गावची जत्रा दोन वर्षे भरली नव्हती व ह्यावर्षी अतिशय उत्साहात जत्रा भरलेली पहायला मिळाली.गेल्या 5-6 वर्षात गावी जत्रेला यायला मिळाले नाही पण यावर्षी जत्रा आहे समजली व रायगड वरून लातूरला जन्मगावी जायचं ठरवलं .जसं आपलं बालपण गावच्या जत्रेत गेलं तसं  आपल्या मुलांनाही गावची जत्रा आनंदता यावी म्हणून अर्णव, अमेयला खास गावची जत्रा दाखवाचीही इच्छा होती तोही चांगला योग आला.आज मुलांसोबत जत्रेत फिरताना व त्यांना जत्रा दाखवताना जुन्या आठवणींना उजळा मिळाला पूर्वीच्या लाकडी रहाटपाळण्याची जागा आता इंजन वरच्या पाळण्यानी घेतली आहे,जम्पिंग जपांग,गोल फिरणारे लोखंडी पाळणे हे नवीन खेळणी प्रकार आताच्या मुलांसाठी आलेले दिसले.पूर्वी 25 पैसे,50 पैसेला ग्यारेगार भेटायचे आज त्या ठिकाणी आईस्क्रीमचे गाडे लागले आहेत,पाणीपुरी ,भेळच्या गाड्या लागल्या आहेत,नवनवीन खेळणी दुकाने लागली आहेत असे अनेक बदल जत्रेत जाणवले पण शेव भज्यांची दुकाने आजही त्याच ठिकाणी आहेत व तोच वास आजही खुणावत होता व  मनाला तृप्त करून टाकत होता.अनेक वर्षे बदलली,जत्रेचे स्वरूप बदलले ,अनेक नवनविन तंत्रज्ञान  बदललं पण आजही गावची अस्मिता ,परंपरा गावच्या जत्रेत कायम आहे, आजही पंचक्रोशीतील अनेकजण दर्शनासाठी येत आहेत जरी आज बैलगाड्या नसल्या तरी दुचाकी, चारचाकी गाड्या गावच्या सीमेवर लागलेल्या आहेत.कोरोनाच्या संकटांनंतर अतिशय उत्साही वातावरणात माझ्या गावची जत्रा साजरी होत आहे.

#माझ्या_गावची_जत्रा....

लहानपणी महाशिवरात्री जशी जशी जवळ येऊ लागली की ओढ राहायची ती गावच्या जत्रेची.आमच्या गावात संत बापदेव महाराजांच्या मंदिरात दर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते व बालपणापासूनच जत्रे बद्दल खूप उत्सुकता राहायची. जत्रा जवळ येऊ लागली की पैसे जमवायचे व जत्रेच्या दिवशी मज्जा करायची हे दरवर्षी ठरलेलं असायचं.जत्रेच्या आदल्या दिवशी मस्त कुस्त्याचा फड रंगायचा पंचक्रोशीतील व बाहेरून अनेक कुस्तीपटू फडात यायचे.आमच्या गावचे पैलवान कै.मधुकर कोटंबे (मधु पहेलवान)म्हणून प्रसिद्ध कुस्तीपटू होते ,दर वर्षी कुस्तीत शेवटची  कुस्ती त्यांची असायची व ते दरवर्षी जिंकायचेच.कुस्तीचा फड काळ्या रानात गोल रिंगण करून भरायचा व गावातील अनुभवी माणसे हे पंच म्हणून फडात असायचे व अगदी आनंदी वातावरणात सायंकाळी दिवस मावळून झापड पडेपर्यंत कुस्तीचा डाव हलकीच्या तालावर रंगायचा हे लहानपणी बघायला खूप मजा यायची.दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जत्रा असल्याने झोप लागायचीच नाही, कधी सकाळ होते व जत्रेत जातो असं व्हायचं.सकाळी लवकर उठून बापूदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायच व मस्त मित्रांसोबत जत्रेत फिरायच.

त्यावेळी सर्वात जास्त आकर्षण असायचं ते रहाटपाळण्याचे,जत्रा सुरू होणार म्हटलं की चार दिवस आगोदर पासून लाकडी रहाटपाळणा गावात यायचा व शाळा सुटली की तो पाळणा फिटिंग कसा करतो तिथं पासून ते जत्रा झाल्यास दोन दिवसानंतर तो जाईपर्यंत त्याच्या सहवासात राहायचो. पूर्वी लाकडी रहाटपाळणा असायचा पाळणा सुरू झाला की त्याचा विशिष्ठ आवाज ऐकू आला की गावातील लहानमुले तिथे पळत पळत जमा व्हायचे व आनंद घ्यायचे.जत्रेत दुसरं आकर्षण म्हणजे डब्ब्यातील पिक्चरचे आपला एकडोळा बंद करून त्या छिद्रातून बघायचं व त्यात चलचित्र दिसायचं व तो डब्बेवाल त्या सिन प्रमाणे गाणे म्हणायचा हे लहानपणी खूप भारी वाटायचं.दिवसभर मित्रांसोबत जत्रेत फिरायचं घरी उपवास म्हणून साबुदाणा खिचडी,रताळे खायची व जत्रेत कांडे-बत्ताशे, शेव-भजीच्या दुकानासमोरून गेलो की खमंग वासाने तिकडे आकर्षित व्हायचो व  उपवासावर पाणी सोडुन मस्त शेव भज्यावर ताव मारायचा वरून मोसंबी खाऊन मस्त दिवस घालवायचा. आमच्या गावाला बापूदेवाच सावरगाव म्हणून ओळखले जायचं व सावरगावची जत्रा म्हटली की पंचक्रोशीतील लोक बैलगाडी,चालत जत्रेला यायचे व आनंद लुटायचे.पूर्वी गावच्या चोहीबाजूला नुसत्या बैलगाड्या दिसायच्या व त्या मोजण्यात खूप आनंद वाटायचा.सायंकाळ होत आली की जत्रा विरळ होत जायची व लोक आपआपल्या गावी व घरी परत जायचे तेंव्हा मन नाराज व्हायचं व अस वाटायचं की जत्रा आणखी कांही दिवस असावी. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना खूप निराश वाटायचं कारण काल ह्याच रस्त्याने जाताना अलोट माणसांची गर्दी असायची व आज तोच रस्ता मोकळा दिसायचा पण पुढील वर्षी जत्रा लवकर येणारच ह्या आशेने पटापट पावले टाकत शाळा गाठायची.

आज खूप वर्षांनी महाशिवरात्रीला गावी आलो होतो व जत्रेत फिरलो त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.कोरोनाच्या संकटामुळे गावची जत्रा दोन वर्षे भरली नव्हती व ह्यावर्षी अतिशय उत्साहात जत्रा भरलेली पहायला मिळाली.गेल्या 5-6 वर्षात गावी जत्रेला यायला मिळाले नाही पण यावर्षी जत्रा आहे समजली व रायगड वरून लातूरला जन्मगावी जायचं ठरवलं .जसं आपलं बालपण गावच्या जत्रेत गेलं तसं  आपल्या मुलांनाही गावची जत्रा आनंदता यावी म्हणून अर्णव, अमेयला खास गावची जत्रा दाखवाचीही इच्छा होती तोही चांगला योग आला.आज मुलांसोबत जत्रेत फिरताना व त्यांना जत्रा दाखवताना जुन्या आठवणींना उजळा मिळाला पूर्वीच्या लाकडी रहाटपाळण्याची जागा आता इंजन वरच्या पाळण्यानी घेतली आहे,जम्पिंग जपांग,गोल फिरणारे लोखंडी पाळणे हे नवीन खेळणी प्रकार आताच्या मुलांसाठी आलेले दिसले.पूर्वी 25 पैसे,50 पैसेला ग्यारेगार भेटायचे आज त्या ठिकाणी आईस्क्रीमचे गाडे लागले आहेत,पाणीपुरी ,भेळच्या गाड्या लागल्या आहेत,नवनवीन खेळणी दुकाने लागली आहेत असे अनेक बदल जत्रेत जाणवले पण शेव भज्यांची दुकाने आजही त्याच ठिकाणी आहेत व तोच वास आजही खुणावत होता व  मनाला तृप्त करून टाकत होता.अनेक वर्षे बदलली,जत्रेचे स्वरूप बदलले ,अनेक नवनविन तंत्रज्ञान  बदललं पण आजही गावची अस्मिता ,परंपरा गावच्या जत्रेत कायम आहे, आजही पंचक्रोशीतील अनेकजण दर्शनासाठी येत आहेत जरी आज बैलगाड्या नसल्या तरी दुचाकी, चारचाकी गाड्या गावच्या सीमेवर लागलेल्या आहेत.कोरोनाच्या संकटांनंतर अतिशय उत्साही वातावरणात माझ्या गावची जत्रा साजरी होत आहे.













🙏🏻🙏🏻

श्री.गजानन पुंडलिकराव जाधव

मु.पो.सावरगाव रोकडा,ता.अहमदपूर, जि.लातूर.



व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...