![]() |
| लढा कोरोना विषाणूशी कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तायडे साहेब व त्यांची टीम यशस्वी जनता कर्फ्यू पार पडताना |
संकल्प_निरोगी_महाराष्ट्राचा...
हे दोन्ही घोषवाक्य ज्या विभागाचे आहेत ते विभाग आजच्या घडीला महाराष्ट्राच्या जनतेला खूप आधार देणारे आहेत,निमीत्त कोरोना सारख्या महाभयानक संसर्गाचा राज्यातील फैलावाचा. चीन सारख्या विशाल देशातून हा घातक विषाणू आज जगभरात पसरून लाखो जणांना बाधित करून हजारो जणांचे प्राण या विषाणूने घेतले आहेत.आज चीन,इटली,अमेरिका,जर्मनी,जपान अशा प्रगत राष्ट्रांनी या विषाणू पुढे गुडघे टेकले आहेत. भारतात गेल्या आठवडा दोन आठवड्या पासून कोरोनाने प्रवेश केला आहे, आज देशात सर्वात जास्त कोरोना बाधीत आपल्या राज्यात आहेत त्यामुळे अधिक सतर्कतेची आपल्याला गरज आहे."पुढच्याला ठेच मागचा शहाणा" या प्रमाणे आपल्या राज्याच्या ,देशाच्या प्रशासनाने सावध व कडक पावले उचलली आहेत.जगात इतर प्रगत राष्ट्रांनी कोरोना बाबत जी हयगय केली त्यातून त्यांना कोरोना च्या 3ऱ्या 4थ्या टप्प्यात कसा फटका पडला हे आपण पाहत आहोत. आपला महाराष्ट्र सध्या दुसऱ्या टप्प्यातून जात आहे त्यामुळे अधिक सावधगिरी बळगली पाहिजे त्या दृष्टीने राज्य प्रशासन पूर्ण तयारीत आहे त्याचाच भाग म्हणून आजच्या स्थितीत राज्यात सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी रविवारी जनता कर्फ्यु चे आहवान केले व त्यांच्या आहवानाल साद देत देशात व राज्यात आज कडेकोट बंद पाळण्यात आला.यात महत्वाची भूमिका राहिली ती पोलीस कर्मचाऱ्यांची,जरी आहवान केले असले तरी त्याची अमलबजावणी पोलीस खात्याशिवाय होणे कठीण असते.पण यावेळी अतिशय प्रेमाने,संयमाने पोलीस खात्याने जनतेच्या सहकार्याने 100% जनता कर्फ्यु यशस्वी करून दाखवला.
आपल्या कुटुंबा पासून दूर राहत आपल्या सर्वांच्या कुटुंबाच्या काळजीसाठी व कोरोना पासून बचाव करण्यासाठी जी पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे ते पाहून त्यांच्या कार्याला सलाम करावा वाटतो.काल पासून कोलाड पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक श्री तायडे साहेब व त्यांच्या टीमने अतिशय मेहनत घेऊन प्रत्येक व्यापारी,छोटे मोठे दुकानदार,ग्रामस्थ यांना प्रेमाने समजावत जो कोलाड नाका मुंबई गोवा महामार्गावर आहे व सतत लोकांची रेलचेल असलेले ठिकाण 100% यशस्वी बंद करून दाखवले त्यांना जनतेने ही मोलाची साथ दिली,असे चित्र संपूर्ण राज्यात आज पाहायला मिळाले.
त्याच प्रमाणे राज्यातील आरोग्य विभाग जीवाचे रान करत प्रत्येक कोरोना ग्रस्तांची , संशयितांची सेवा करत आहेत ,ध्येय एकच की महाराष्ट्रात कोरोनोचा प्रसार थांबला पाहिजे. आज राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री तसेच सर्व प्रशासन आपल्यासाठी जीवाचे रान करत आहेत तर आपली ही जबाबदारी आहे की आपलं रक्षण आपणच केलं पाहिजे व कोरोनो ला आपल्या पासून दूर ठेवले पाहिजे. सध्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र आहे व हा गुणकाराचा टप्पा मानला जातो, इटलीत तर तिसऱ्या टप्प्याने थैमान घातला आहे त्यामुळे आपण येणारे 15 दिवस स्वतःला कोरोनो पासून रोखण्यासाठी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे असे वाटते.
वेळ गेल्यास डोक्यावर हात मारून घेण्यापेक्षा वेळवर डोकं चालवल तर आपण कोरोना पासून निश्चित बचाव करू शकतो हे मात्र नक्की.....
![]() |
| मुंबई गोवा महामार्ग 100%बंद |
![]() |
| कोलाड बाजारपेठ 100%बंद |



खूप छान माहिती व लेखन
उत्तर द्याहटवापोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम
धन्यवाद सर
हटवाखूप छान सर
उत्तर द्याहटवाNice work
उत्तर द्याहटवाछान शब्दांकन स्तुत्य उपक्रम या ब्लॉग स्पॉटला माझ्या खूप खूप शुभेच्छा मित्रा
उत्तर द्याहटवाआम्ही आपले खुप आभारी आहोत. आपले सर्वाच असेच सहकार्य प्रशासणाला राहिले तर करोनाच्या लढाईत विजय आपलाच आहे.
उत्तर द्याहटवाछान शब्दांकन आपण सर्व आपले राष्ट्रीय कर्तव्य पाळुया आणि कोरोनाला कायमचे हद्दपार करुया
उत्तर द्याहटवाGreat work.
उत्तर द्याहटवासर्वांचे आभार
उत्तर द्याहटवा