मंगळवार, ५ मे, २०२०

घरातील पहिला डॉक्टर बळीराजाच्या सेवेत रुजू....

डॉ.रजनीकांत मेघालय राज्यातील राष्ट्रीय कृषि चर्चासत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना. 
म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी असते तसेच माझ्या पुतण्याच्या बाबतीत झाले, आईवडिलांची खूप इच्छा होती मुलगा डॉक्टर व्हावा व गोरगरिबांची सेवा करावी पण महाविद्यालयीन वयात असलेला अल्लडपणा व स्वप्नाची नसलेली जाण यामुळे त्याचा मेडिकलचा नंबर हुकला व आईवडिलांनी पाहिलेले डॉक्टरकीचे स्वप्न भंगले. हे अपयश त्याच्या मनाला एवढं झोंबल की त्याने ठरवलं आपण डॉक्टर व्हायचंच व गोरगरिबांची सेवा करायची व  आज अथक परिश्रमाने तो जरी माणसांचा डॉक्टर झाला नसला तरी बळीराजाचा शेतकी डॉक्टर झाला व आज तो एका कृषी संशोधन संस्थेत रुजू झाला.
माझा पुतण्या म्हणजे माझ्या सर्वात मोठ्या काकांच्या मोठ्या मुलाचा म्हणजे रमाकांत जाधव यांचा मुलगा रजनीकांत. त्याला आम्ही सर्व लाडाने शहाजी म्हणतो.शहाजीचा जन्म 23 मे 1992 चा. त्याचे प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले व माध्यमिक शिक्षणासाठी तो काकांकडे उदगीरला गेला. काका काकी पाशी राहून त्याने आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण उदगीर येथील लाल बहाद्दूर शाळेतून पूर्ण केले.आई वडिलांची इच्छा होती रजनीकांत डॉक्टर व्हावा म्हणून त्याला लातूर येथील सोनवणे कॉलेजला प्रवेश दिला पण जेंव्हा मुलं महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतात तेंव्हा नवीन वातावरणात रुळताना ध्येयाकडे दुलक्ष होत व वेळ गेल्यास समजत की आपण कुठे चुकलो.रजनिकांतच्या बाबतीत हि तेच झालं आम्हला अपेक्षा होती तो चांगले मार्क मिळवेल व डॉक्टरकीला नंबर लागेल पण त्याला कमी मार्क मिळाले व त्याच्या सहीत आईवडिलांचे स्वप्न भंगले हेच त्याचे पहिले अपयश होते व  त्याला खूप मोठा धडा देऊन गेला.
आता बारावी नंतर काय करायचं यांच विचारात असताना त्याने bsc agri करायची ठरवली व चार वर्षासाठी तो बारामती येथील कृषी महाविद्यालयात गेला.तेंव्हा बारामतीचे वातावरण,पश्चिम महाराष्ट्रातील शेतीसाठी होत असलेले प्रयत्न हे पाहून त्याला अधिक आवड निर्माण झाली व तो एक एक पाऊल पुढे टाकू लागला.या चार वर्षाच्या काळात त्याने खूप काही नवीन गोष्टी शिकल्या व त्याच्या टीमने त्या दरम्यान एक यशस्वी प्रयोग केला व त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री मा.श्री शरदचंद्र पवार साहेबांनी यांच्या टीमची भेट घेतली व मार्गदर्शन केले हा त्याच्यासाठी खूप प्रेरणादायी क्षण होता.चार वर्षे डिग्री पूर्ण केल्यानंतर त्याने Msc agri करायचं ठरवलं पण ते सोप्प नव्हतं त्याने खूप अभ्यास केला व देशातून घेतली जाणारी indian council of agricultural research ICAER च्या इंटर्न्स मध्ये यश मिळवले व लातूर येथील कृषी महाविद्यालयात वनस्पती रोगशास्त्र विषयात प्रवेश मिळवला.या दोन वर्षात आपल्या ज्ञानात भरपूर भर टाकत वेगवेगळे प्रयोग करत कृषी क्षेत्रात  कार्य सुरू केले.इकडे वडील मुलगा शिकत आहे म्हणून परिस्थितीशी झुंझ देत त्याच्या शिक्षणाच्या खर्चासाठी कष्ट करत होते व याची जाण ठेवत रजनीकांत ही आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी जीवाचे रान करत अभ्यास करत होता.msc agri करत असताना रजनीकांतला 12 वी नंतर हुकलेले डॉक्टरीची संधी स्वस्त बसू देत नव्हती व त्याला नेहमी ही गोष्ट स्वस्त बसू देत नव्हती.त्याने ठरवलं होतं आपण जरी माणसांचा डॉक्टर झालो नसलो तरी कृषी क्षेत्रात संशोधन करून शेतकरी राजासाठी सेवा करण्यासाठी डॉक्टर व्हायचं व याच जिद्दीने त्याने msc agri केल्यानंतर नोकरी नकरता PhD करण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी त्याला खडतर प्रवास करावा लागणार होता त्यासाठी त्याने अभ्यास केला व MCAER-  maharashtra council of agricultural research द्वारा घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेत यश मिळवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे प्रवेश मिळवला. 2016 ते 2019 या तीन वर्षात वनस्पती रोगशास्त्र या मुख्य विषयात PhD करत असताना अनेक संशोधने केले. त्यात studies on kagzi lime bacterial canker caused by xanthomonas axonopodis pvcitri ( कागदी लिंबू वरील झ्यान्थोमोनास अक्सनोपोडिस या जिवाणू मूळे होणाऱ्या खैऱ्या रोगाचा अभ्यास) यावर यशस्वी संशोधन केले.phd च्या शेवटच्या वर्षात जैविक कीटकनाशक तयार करणाऱ्या प्रोजेक्टवर त्याने यशस्वी काम केले.तीन वर्षांच्या काळात हे संशोधन करत असताना शिक्षणासाठी लागणार खर्च त्याने बँकेत कर्ज काढून पूर्ण केले व शिक्षण घेत घेत काम ही केले.PhD पूर्ण झाल्यावर याच प्रोजक्टवर 8 महिने सहायक संशोधक म्हणून काम केले.वयाच्या 28 व्या वर्षी कृषी क्षेत्रातील डॉक्टरेट त्यांनी पूर्ण करून एक आदर्श निर्माण केला आहे.याच दरम्यान त्याने केलेले संशोधन पेपर सात राष्ट्रीय पातळीवरील जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले आहेत व 5 पेपर प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत.आतापर्यंत रजनीकांत ने 4 राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग नोंदवला आहे. नोव्हेंबर 2019 साली मेघालय राज्यात झालेल्या राष्ट्रीय कृषि चर्चासत्रात सहभाग नोंदवून त्याने महाराष्ट्राचे कृषिक्षेत्रातील नाव उज्जल केले आहे. हा खडरत प्रवास करून आज तो एक बळीराजासाठी डॉक्टर रुपात कार्याला सुरवर करत आहे. त्याला नुकतीच आंतराष्ट्रीय कृषी क्षेत्रात काम करणारी MNC Bayer crop science या जर्मन कंपनीत Executive Field quality या पदावर नेमणूक मिळाली आहे.शेतकऱ्याच्या बियाणे उत्पादन क्षेत्रावरील रोग व कीड नियंत्रण करणेसाठी मार्गदर्शन करणे,ट्रेनिंग घेणे अशा स्वरूपातील फिल्डवरील जॉब मिळाला आहे.4 मे 2020 रोजी रजनीकांत देऊळगाव राजा जि.बुलढाणा येथील कंपनीच्या कार्यक्षेत्रात तो रुजू झाला आहे.
आई वडिलांनी व घरच्यांनी राजनिकांतच्या रुपात पाहिलेले डॉक्टरकीचे स्वप्न आज त्याने पूर्ण केले आहे व जरी माणसांचा डॉक्टर होऊ शकला नाही तरी माणसं जगवणाऱ्या बळीराजाच्या  सेवेतील डॉक्टर होऊन त्याने कार्याला सुरवात केली आहे. पुढील काळात रजनीकांत ने म्हणजे आमच्या शहाजीने आपल्या कुशल बुद्धिमतेतून कृषिप्रधान देशातील शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी उत्तम कार्य करावे  व आईवडिलांचे कुटुंबाचे,गावाचे,जिल्ह्याचे,राज्याचे तसेच देशाचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर उज्जल करावे हीच मनपूर्वक सद्धीचा....
💐💐💐💐💐
✍️ श्री गजानन पुंडलिकराव जाधव
9923313777





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...