*रा.जि.प शाळा संतोषनगर शाळा डिजिटल कशी झाली त्याची कहाणी*
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण मिडियाकडे पाहत असतो.याच मीडियामुळे माझ्या जि प शाळा संतोषनगरच्या शाळेचा कसा बदल झाला थोडक्यात सांगावस वाटत.कांही महिन्यांपूर्वी सोशेल मीडियावर माझ्या शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलींच्या व त्यांच्या आजीच्या संघर्षाची कथा पोस्ट केली होती व ती बातमी *झी 24 तास* व इतर प्रसारमाध्यमांनी दाखवली व याची दखल घेत अलिबागच्या *श्री राजाभाऊ ठाकूर* या दानशूर सामाजिक कार्यकर्त्याने मुलींच्या शिक्षणासाठी *100000 रु.* मदत केली.तसेच ती बातमी नाशिक येथील *श्री गोविंद चौधरी* या दानशूर उद्योजकाने पहिली व संतोषनगर शाळा दत्तक घेतली तसेच प्रत्येक मुलाला वर्षाला *6000 रुपये* शिष्यवृत्ती सुरवात केली व स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला संतोषनगर शाळेला *51000 रु.* देणगी देऊन शाळा डिजिटल केली. आज हे सर्व मीडियामुळे प्रसिद्धी मिळाल्याने व शाळेच्या विकासासाठी दानशूर व्यक्तीने मदत केल्यामुळे शाळेचे रूप बदलत आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा