15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल पण कोरोनामुळे शाळा सुरु होतील याची शाश्वती नाही.मागच्या सत्रातील 1 महिना कोरोनाचा सुट्टीत गेला त्यामुळे आहे त्या परिस्थितीत वर्ष संपवावे लागले. जवळपास शैक्षणिक वर्षाच्या शेवटी हे संकट देशावर व राज्यावर आले व 17 मार्च नंतर शाळेंना सुट्टी दिली.वाटत होत 3 महिन्यात कोरोनाचा कहर कमी होईल पण उलट कोरोना आता शहरी भागातून ग्रामीण भागात पसरत आहे त्यामुळे जेथे जायला रस्ता नाही अशा दुर्गम वाड्या वस्त्यांवर कोरोना पोहचला आहे. अशा स्थितीत येणारे शैक्षणिक वर्ष कसे असावे,मुलांचे शिक्षण कसे सुरु ठेवावे या बाबत सरकार,शिक्षणतज्ज्ञ आप आपले मत व्यक्त करून त्यावर उपाय काढत आहेत.15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु होईल व यापुढील शिक्षण ऑनलाईन कसे असेल किंव्हा ऑफलाईन कसे देता येईल ते सरकार ठरवेल ,किंबहुना मोबाईल ,टी.व्ही,याद्वारे शिक्षण देता येईल का? याची पडताळणी ही सुरु झाली आहे.केंद्र सरकाने तर शैक्षणिक चॅनल्ससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच राज्य सरकार पण याविषयी पाऊले उचलत आहे. याबाबतीत राज्यातील सर्वत्र परिस्थिती सारखी नाही गेल्या 14 वर्षांपासून आदिवासी क्षेत्रात शिक्षक म्हणून काम करत असताना नेहमी येणाऱ्या अडचणी व या कोरोना काळात पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करताना येणाऱ्या समस्या काय असतील याबाबत मत मांडणार आहे.
राज्यात खूप मोठ्या प्रमाणत दुर्गम भागात आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत,विदर्भ,खान्देश,कोकण,मराठवाड्यातील कांही भागात विविध आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत.राज्यातील जवळपास 27% मुलं हे बोलीभाषिक आहेत व ते डोंगर दऱ्यात वास्तव्यास आहेत. नेहमीच्या काळात या मुलांच्या शिक्षणात अनेक अडथळे पार करत शिक्षण घ्यावे लागते. पालकांची शिक्षणाबाबत असणारी उदासीनता,स्थलांतर,लहान मुलांचा सांभाळ,आर्थिक परिस्थिती अशा अनेक अडचणींचा सामना करत हे मुलं शिक्षण घेत आहेत. त्या त्या ठिकाणी काम करणारा आमचा शिक्षक बांधव दररोज शाळेत गेल्यावर त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन येतो,त्यांना आंघोळ घालतो, मोठ्या मुलांचे शिक्षण सुरु राहावे म्हणून त्यांच्या लहान भावंडाची सोय शाळेत करतो,स्थलांतर रोखतो,स्थलांतर होऊन आलेल्याना प्रवेश देतो व अशा अनेक अडचणीतून जाऊन तेंव्हा कुठे मुलांच्या औपचारिक शिक्षणाला सुरवात होते. ही परिस्थिती जर कोरोना काळापूर्वीची असेल तर यापुढील शिक्षण कसे होईल ही खरी चिंता आहे.टी व्ही ,मोबाईल तर दूरची गोष्ट पण दोन वेळच्या जेवणाची चिंता असणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. शाळेत दुपारचे जेवण भेटते या आशेने लाखो दुर्गम,आदिवासी भागातील मुलं शाळेत येतात व त्यानिमित्त शिक्षण घेतात पण आता शाळा बंद व शिक्षण सुरु अशा मोहिमेत हे मुलं कसं शिक्षण घेतील हा ही एक प्रश्न आहे. आदिवासी ,दुर्गम भागात स्थलांतर तर खूप मोठा प्रश्न दर वर्षी लाखो कटुंबे हंगामी स्थलांतर करतात व त्यांचे मुलं ही सोबत असतात तर शाळा गावात असेल तर ते मुलांना घरातील जेष्ठ मंडळीपाशी ठेऊन जातात व त्यांचे शिक्षण सुरु राहते पण पुढील काळात शाळाच बंद व online शिक्षण म्हटलं तर या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे.
ज्या मुलांच्या शिक्षणासाठी पावलो पावली समस्या नेहमी असतात अशा मुलांच्या पुढील काळातील शिक्षणासाठी खालील कांही प्रश्न उपस्थित होतात त्याबाबत विचार करणे खूप गरजेचे आहे.
1. 90 ते 95% आदिवासी,दुर्गम भागातील,गरीब,मजूर, पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल,टी व्ही नाहीत अशा वेळी शाळा सुरु न करता शिक्षण कसे सुरु करता येईल?
2.राज्यातील दुर्गम,अतिदुर्गम भागात जिथे मोबाईल रेंज नाही की कुठले डिजिटल साधने नाहीत तेथील मुलांचे शिक्षण कसे होईल?
3.नेहमी दररोज मुलांना शोधून शाळेत आणावे लागते,त्यांना टिकवावे लागते अशा मुलांचे शाळा बंद असल्यास शिक्षण कसे सुरु करता येईल?
4.शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दर वर्षी आणलं जात पण यावर्षी सुरवातीला शाळा बंद असल्या तर ह्या मुलांचे शिक्षण कसे होणार?
5.ज्या पालकांकडे tv आहे,मोबाईल आहे हे साधन मनोरंजन म्हणून पहिले जाते व जेंव्हा त्यावरून शिक्षण सुरु होईल त्यावेळी ते मुलं खरंच शिक्षण घेतील का?
6.शिक्षण म्हणजे शिक्षक विध्यार्थी यांची आंतरक्रिया मग कोरोना काळात एकतर्फी पद्धतीत खरच मुलांचे शिक्षण होईल का?
7.दुपारचे माध्यान भोजन शाळेत मिळते व आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांसोबत आपल्या लहान मुलांना ही बिनधास्त शाळेत सोडून मजुरीला जाणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे शिक्षण शाळा बंद असल्यास कसे होणार?
असे अनेक प्रश्न पावलो पावली पडत असतात.ज्या ठिकाणी दररोज शिक्षण घेण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात अशा ठिकाणी जो पर्यंत वर्गात शाळा भरवल्या जात नाहीत तो पर्यंत मुलांचे शिक्षण सुरळीत होणार नाही. सध्या शिक्षणासाठी प्रस्तावित online, tv, app हे साधने ठराविक मुलांच्या शिक्षणासाठी मर्यादित आहेत याचा वापर सर्वत्र करणे अशक्य आहे.
दुर्गम,ग्रामीण,आदिवासी क्षेत्रात जो पर्यन्त शाळेत वर्ग भरणार नाहीत, शिक्षक विध्यार्थी समोरासमोर बसून आंतरक्रिया घडणार नाहीत,शिक्षक दररोज वाड्या वस्त्यांवर घरोघरी जाऊन मुलांना शाळेत घेऊन येऊन शिक्षण देणे सुरु होणार नाही तो पर्यंत इतर कुठल्याही माध्यमातून दिलेले शिक्षण प्रभावी ठरणार नाही हे मात्र तेवढेच कटू सत्य आहे…
राज्यात खूप मोठ्या प्रमाणत दुर्गम भागात आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत,विदर्भ,खान्देश,कोकण,मराठवाड्यातील कांही भागात विविध आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत.राज्यातील जवळपास 27% मुलं हे बोलीभाषिक आहेत व ते डोंगर दऱ्यात वास्तव्यास आहेत. नेहमीच्या काळात या मुलांच्या शिक्षणात अनेक अडथळे पार करत शिक्षण घ्यावे लागते. पालकांची शिक्षणाबाबत असणारी उदासीनता,स्थलांतर,लहान मुलांचा सांभाळ,आर्थिक परिस्थिती अशा अनेक अडचणींचा सामना करत हे मुलं शिक्षण घेत आहेत. त्या त्या ठिकाणी काम करणारा आमचा शिक्षक बांधव दररोज शाळेत गेल्यावर त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन येतो,त्यांना आंघोळ घालतो, मोठ्या मुलांचे शिक्षण सुरु राहावे म्हणून त्यांच्या लहान भावंडाची सोय शाळेत करतो,स्थलांतर रोखतो,स्थलांतर होऊन आलेल्याना प्रवेश देतो व अशा अनेक अडचणीतून जाऊन तेंव्हा कुठे मुलांच्या औपचारिक शिक्षणाला सुरवात होते. ही परिस्थिती जर कोरोना काळापूर्वीची असेल तर यापुढील शिक्षण कसे होईल ही खरी चिंता आहे.टी व्ही ,मोबाईल तर दूरची गोष्ट पण दोन वेळच्या जेवणाची चिंता असणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. शाळेत दुपारचे जेवण भेटते या आशेने लाखो दुर्गम,आदिवासी भागातील मुलं शाळेत येतात व त्यानिमित्त शिक्षण घेतात पण आता शाळा बंद व शिक्षण सुरु अशा मोहिमेत हे मुलं कसं शिक्षण घेतील हा ही एक प्रश्न आहे. आदिवासी ,दुर्गम भागात स्थलांतर तर खूप मोठा प्रश्न दर वर्षी लाखो कटुंबे हंगामी स्थलांतर करतात व त्यांचे मुलं ही सोबत असतात तर शाळा गावात असेल तर ते मुलांना घरातील जेष्ठ मंडळीपाशी ठेऊन जातात व त्यांचे शिक्षण सुरु राहते पण पुढील काळात शाळाच बंद व online शिक्षण म्हटलं तर या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे.
ज्या मुलांच्या शिक्षणासाठी पावलो पावली समस्या नेहमी असतात अशा मुलांच्या पुढील काळातील शिक्षणासाठी खालील कांही प्रश्न उपस्थित होतात त्याबाबत विचार करणे खूप गरजेचे आहे.
1. 90 ते 95% आदिवासी,दुर्गम भागातील,गरीब,मजूर, पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल,टी व्ही नाहीत अशा वेळी शाळा सुरु न करता शिक्षण कसे सुरु करता येईल?
2.राज्यातील दुर्गम,अतिदुर्गम भागात जिथे मोबाईल रेंज नाही की कुठले डिजिटल साधने नाहीत तेथील मुलांचे शिक्षण कसे होईल?
3.नेहमी दररोज मुलांना शोधून शाळेत आणावे लागते,त्यांना टिकवावे लागते अशा मुलांचे शाळा बंद असल्यास शिक्षण कसे सुरु करता येईल?
4.शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दर वर्षी आणलं जात पण यावर्षी सुरवातीला शाळा बंद असल्या तर ह्या मुलांचे शिक्षण कसे होणार?
5.ज्या पालकांकडे tv आहे,मोबाईल आहे हे साधन मनोरंजन म्हणून पहिले जाते व जेंव्हा त्यावरून शिक्षण सुरु होईल त्यावेळी ते मुलं खरंच शिक्षण घेतील का?
6.शिक्षण म्हणजे शिक्षक विध्यार्थी यांची आंतरक्रिया मग कोरोना काळात एकतर्फी पद्धतीत खरच मुलांचे शिक्षण होईल का?
7.दुपारचे माध्यान भोजन शाळेत मिळते व आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांसोबत आपल्या लहान मुलांना ही बिनधास्त शाळेत सोडून मजुरीला जाणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे शिक्षण शाळा बंद असल्यास कसे होणार?
असे अनेक प्रश्न पावलो पावली पडत असतात.ज्या ठिकाणी दररोज शिक्षण घेण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात अशा ठिकाणी जो पर्यंत वर्गात शाळा भरवल्या जात नाहीत तो पर्यंत मुलांचे शिक्षण सुरळीत होणार नाही. सध्या शिक्षणासाठी प्रस्तावित online, tv, app हे साधने ठराविक मुलांच्या शिक्षणासाठी मर्यादित आहेत याचा वापर सर्वत्र करणे अशक्य आहे.
दुर्गम,ग्रामीण,आदिवासी क्षेत्रात जो पर्यन्त शाळेत वर्ग भरणार नाहीत, शिक्षक विध्यार्थी समोरासमोर बसून आंतरक्रिया घडणार नाहीत,शिक्षक दररोज वाड्या वस्त्यांवर घरोघरी जाऊन मुलांना शाळेत घेऊन येऊन शिक्षण देणे सुरु होणार नाही तो पर्यंत इतर कुठल्याही माध्यमातून दिलेले शिक्षण प्रभावी ठरणार नाही हे मात्र तेवढेच कटू सत्य आहे…













