सोमवार, ११ मे, २०२०

हेच आमचं ऑनलाईन शिक्षण...

निसर्ग शिक्षणाचा आनंद घेताना आमचे मुलं
17 मार्च पासून कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी राज्यातील शाळा बंद झाल्या व ऐन वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात मुलांना अघोषित सुट्टी मिळाली.त्यानंतरच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी online वर्ग भरवले जाऊ लागले व त्याचा परिणाम सकारात्मक येऊ लागला.ज्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत अशा पालकांचे व्हाट्स अँप  ग्रुप सुरु केले गेले त्यावर दररोज अभ्यास देऊन शिक्षण सुरु राहू लागले.शाळा बंद अभ्यास सुरू या घोषवाक्यखाली राज्यात मोहीम सुरू झाली व कालांतराने शिक्षण विभागाने ही पुढाकार घेत परिपत्रक काढत मुलांना online शिक्षण देत त्यांचा राहिलेला अभ्यास पूर्ण करून घेण्याचे सुचवले व त्याप्रमाणे राज्यात वर्गावर्गाचे whatsapp ग्रुप तयार होऊ लागले व शिक्षण सुरु झाले.दीक्षा अँप व इतर तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून शाळा बंद शिक्षण सुरु मोहीम सुरू झाली.पण यात अपवाद राहिल्या दुर्गम,डोंगराळ,आदिवासी क्षेत्रातील शाळा,गरीब विध्यार्थी, ज्यांच्या घरी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था कशी होईल याची चिंता तेव्हा त्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल दूरच साधा मोबाईल पण नाही अशा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचे काय त्यासाठी अनेक चर्चा झाल्या सर्वे झाले त्यात ATF या शिक्षक समूहाच्या माध्यमातून राज्यात सर्वे केला व राज्यातील फक्त 20% मुलांपर्यत online शिक्षण पोहचते याचा निष्कर्ष निघाला व यावर अनेक चर्चा ही झाल्या की पुढील काळात प्रत्येक मुलांपर्यत कसे शिक्षण पोहचेल व सर्व मुलांना कशा प्रकारे अध्ययन-अध्यापन करता येईल व त्यावर भविष्यात मार्गही निघतील.पण अशाच अँड्रॉईडच्या online जगापासून  पासून वंचीत शाळेतील शिक्षक या नात्याने कांही गोष्टी मांडाव्या वाटतात.
माझी शाळा डोंगर भागातील शाळा, शाळेत 59 विध्यार्थी सर्व पालक मजुरी करून गुजराण करणारे व दोन वेळच्या जेवणाच्या शोधात राहणारे,अँड्रॉईड सोडा जेमतेम 3 ते 4 पालकांकडे साधे मोबाईल आहेत,95% पालक निरक्षर, 58 विध्यार्थी कातकरी बोलीभाषिक,अनेक पालक झोपडीत राहतात,आदिवासीवाडीत 4G,3G सोडा साध्या रेंजची ही मारामार अशा स्थितीत कोरोनाने देशाला,राज्याला गाठले व शाळेला अघोषित सुट्टी पडली, इकडे राज्यात शाळा बंद पण शिक्षण सुरु ही मोहीम जोरदार सुरु झाली घरोघरी पालकांच्या मोबाईलवर मुलं आपल्या गुरुजींनी दिलेला अभ्यास करत होते,यूट्यूब वर व्हिडीओ बघत होते,online टेस्ट सोडवत होते तर दुसऱ्या बाजूला माझ्या शाळेतील मुलांचा दिनक्रम सकाळी उठणे, जंगलात भटकणे,नदीवर पोहायला जाणे,गलोल घेऊन पक्षी,प्राण्यांची शिकार करणे,झाडावर चढणे, रानंमेव्याचा आस्वाद घेणे, चुलीत जाळण्यासाठी लाकडं गोळा करणे,पक्षासारखं बागडने असा रानंपाखरांचा online अभ्यास सुरू होता. एका बाजूला अँड्रॉईडवाले मुलं भराभर मोबाईलवर गणिते सोडावीत होते बेरीज ,वजाबाकी करत होते तर आमचे मुलं गलोलने किती दगडात किती आंबे पाडले हे शिकत होते.अँड्रॉईडवाले मुलं यूट्यूबवर निसर्ग,जंगल,पाणी,नद्या,फुलपाखरू,रानफळ,जंगली पशुपक्षी पाहत होते तर तेच आमचे मुलं रानावनात भटकून त्याचा प्रत्येक्ष अनुभव घेऊन शिक्षण घेत होते. Online अभ्यास करणारे मुलं दिवसभराचा अभ्यास  गुरुजी कडून दररोज संध्याकाळी whatsapp ग्रुप वर तपासून घेत होते तर आमचे मुलं दररोज संध्याकाळी घरकामात आई वडिलांना त्यांच्या मदत करत,आजीआजोबा सोबत गप्पा मारत आकाशातील चांदण्या मोजत, दुकानातील वस्तू आणून त्याचा हिशेब करत आपल्या ज्ञानाचे उपयोजन करत होते.
सांगायचं एवढंच की शिक्षण हे कधीच थांबत नाही ते सतत चालूच असते फक्त त्याचे माध्यम वेगवेगळे असते.शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे नसून ते आपण दररोज जीवनात कशा प्रकारे जगतो ते शिक्षण अभिप्रेत आहे. आज जरी माझ्या शाळेतील मुलांना अँड्रॉईड मोबाईलवर online शिक्षण घेता येत नसले तरी ते निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन शिक्षण घेत आहेत.या लॉकडाऊन काळातील मुक्त शिक्षणातून आमची मुलं जलतरण,नेमबाजी,धावणे,हस्तकला,चित्रकला,नृत्यकला,यात पारंगत होऊन भविष्यात आपले करियर घडवू शकतील. आमच्या मुलांसाठी कोरोना काळात हेच अनुभवातून मिळालेले निसर्गशिक्षण त्यांच्या पुढील वाटचालीस गती देणारे ठरेल...

✍🏻...श्री गजानन पुंडलिकराव जाधव
प्राथमिक शिक्षक,जि प रायगड.
09923313777
gajanan.jadhav1984@gmai.com

६ टिप्पण्या:

  1. अगदी बरोबर गजानन. छान केलंस हे लिहून. आदिवासी, डोंगराळ, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची, पालकांची परिस्थिती, त्यांचे जागण्याचे प्रश्न सर्वांसमोर येणे गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. आगदी खर आहे मित्रा.खेडयापाडयावरील लोकांना दोन वेळेच जेवण लवकर मिळत नाही आणि onlineशिक्शनासाठी मोबाईल कुठून मिळेल.

    उत्तर द्याहटवा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...