#शिक्षणाची_बेट
* दि.२२जुलै २०१८ रोजीच्या #दै_पुण्यनगरी या वर्तमानपत्राच्या '#प्रवाह' या पुरवणीतील शिक्षणाची बेट शैक्षणिक कार्याविषयीचा 'बोलीभाषेतून शिक्षणाची गोडी या लेखातून #श्री_संतोष_मुसळे(जालना) सरांनी माझ्या 12 वर्ष शैक्षणिक कार्याचा घेतलेला आढावा
बोलीभाषेतून शिक्षणाची गोडी लावणारा!
निसर्गान भरभरुन सौंदर्य दिलेला कोकणचा परिसर सर्वांनाच आवडतो.उंच उंच सह्याद्रीच्या डोंगररांगा,सतत रिमझिम पडणारा पाऊस,दुधासारखे फेसाळणारे धबधबे,कौलारु घरे,धानाची शेती,आंबे,काजुची झाडे हे निसर्गरम्य व मनमोहक दृश्य पाहिले की मन प्रसन्न होते.मात्र उंचसखल भागात मोठ्या जिकरीने व हिरीरीने निसर्गासारख्याच शाळा उभारुन छोटी छोटी शिक्षणाची बेट तयार करतायेत यापैकीच एक पाले खुर्द ता.रोहा जि.रायगड येथील गजानन जाधव यांना आज भेटूयात.
*लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव* येथील राहणारा गजानन लहानपणापासून मराठवाड्यात पडणारा सततचा दुष्काळ तो बघत आलाय.याच दुष्काळाच्या सावटाखाली शिक्षणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.कारण पावसाअभावी शेतीत काहीच पिकायचे नाही.आयुष्यात शिकून खुप मोठे व्हायचे होते मात्र परिस्थितीने त्याला डी.एड. करायला लावले.त्याची आई नेहमी सांगायची गजानन जे काही काम करशील ते मनापासून व अपेक्षाविरहीत कर.
डी.एड.झाल्यानंतर २००६ साली रायगड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नौकरीस तो रुजू झाला.मनात खुप सारी स्वप्नांची खुणगाठ बांधून तो शाळेवर जाण्यास उत्सुक होता.त्याला रोहा तालुक्यातील पाले खुर्द आदिवासीवाडी ही शाळा त्याला मिळाली.समुद्रसपाटीपासून साधारण २ किलोमीटर डोंगराच्या कडेला वसलेला छोटासा आदिवासी पाडा व तेथील छोटीशी टुमदार शाळा एकदाची त्याच्या नजरेस पडली.पाड्यावर जायला कच्चा रस्ता असल्याने पायीच चालत जावे लागायचे.पाड्यावर गेल्यावर निदर्शनास आले की येथील संपूर्ण वस्ती ही कातकरी आदिवासी समुदायाची . सुरवातीच्या कळात गजाननला त्यांची भाषा व त्यांना गजाननची भाषा समजतच नव्हती म्हणून गजाननला भीती वाटायची. कारण या आगोदर फक्त पुस्तकात कातकरी आदिवासी जमाती विषयी ऐकले होते त्यांचे राहणीमान,जीवनशैली अगदी वेगळी ,गरजे पुरते कपडे व कमरेला सतत एक कोयता असतो हे चित्र पुस्तकातून पाहिले होते.मात्र जसेजसे दिवस लोटले जावू लागले नंतर हळू हळू या समुदायाविषयीची भीती कमी झाली.
आपली नेमणूक येथील मुलांना शिकविण्यासाठी झालेली आहे हे गजू जाणून होता.आता त्याने मोर्चा आदिवासीच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल याकडे वळवला.घरोघरी भेटी घेवून पालकांची मानसिकता बदलली. सुरवातीच्या काळात म्हणजेच २००६ते २००९या कालावधीत मुलांसोबत राहून,पालका सोबत मिसळून कातकरी समुदायबद्दल बरीच माहिती त्याने मिळवली होती.पण मूळ प्रश्न होता भाषेचा कारण सर्व वस्तीत कातकरी बोलीभाषा बोलली जायची व तोस मराठी बोलीभाषिक असल्यामुळे शाळेतील विध्यार्थी व त्याच्यात संवाद साधताना गोंधळ उडून जायचा.कारण ते जास्तीतजास्त कातकरी भाषेत संवाद साधायचे व ते त्याला समजायचे नाही.
आता मुलासोबत राहून आपन त्यांची भाषा शिकायला हवी असे गजूने ठरविले.कालांतराने मुलांमध्ये राहुन त्याचे ऐकून कांही शब्द समजू लागले जसे मुलगा-सोहरा,मुलगी-सोहरी,वडील-बाहस, आई-बय अशा प्रकारे त्यांचे हे शब्द ऐकून थोडी कातकरी बोलिभाषा तो समजू लागला व कालांतराने मुलांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधू लागला.गुरुजी आपल्या भाषेत बोलतात हे बघून मुलांनाही छान वाटू लागले त्यामुळे मुलं माझ्या अधिक जवळ येऊ लागली.सामान्यपणे राज्याच्या शिक्षणाची विभागणी करावयाची झाल्यास शहरी,ग्रामीण व आदिवासी अशी करावी लागेल.प्रमाण मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके शहरी भागातील व ग्रामीण भागातील मुलांना सहज समजतात मात्र आदिवासी भागात प्रमाण भाषा अजिबातच समजत नाही व यातूनच ती मूले शाळेच्या प्रवाहाबाहेर जातात.यामागील कारण म्हणजे त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण दिल्यास ती मुल नक्कीच शिक्षणप्रवाहात कायम राहतील आणि हेच गजाननने कातकरी बोलीभाषेत साहित्य निर्मिती करुन साध्य केलेय.
उपक्रम:
१)कातकरी-मराठी शब्दसंग्रह :-
आदिवासी पाड्यावरील मुलांंमध्ये राहून बऱ्यापैकी कातकरी भाषेची ओळख त्यांना झाली होती.मग मुलांच्या भावविश्वातील ,परिसरातील,कुटुंबातील तसेच प्राण्यांचे ,पक्षांचे कातकरी बोलीभाषेतील शब्द व त्याचा मराठीत अर्थ अशा १०० शब्दाचा संग्रहत्याने बनवला. जसे फुलपाखरू-भिंगरूट,अंडी-साकु, म्हातारा-डवर, म्हातारी-डोसी अशा दररोज बोलल्या जाणाऱ्या शब्दांचा यात समावेश होता.आता मुलेही सरांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधू लागली व एकूणच शिक्षणाची गाडी रुळावर यायला लागली.या शब्दसंग्रहाचा फायदा म रायगड जिल्ह्यातील अनेक कातकरी वस्तीवर काम करणाऱ्या शिक्षकांना झाला.कारण ज्याप्रकारे भाषेची अडचण गजाननला येत होती तशीच इतरांनाही येत होती .यामुळे कातकरी बोलीभाषेत साहित्य निर्मितीची अधिक गरज ओळखुन पुढील प्रवास सुरु ठेवला.
२)बालगोष्टी कातकरी-मराठी:-
कातकरी भाषेतील शबादसंग्रहाचा साठा गजाननकडे बऱ्यापैकी झाला होता.पाड्यावरील मुले व तो योग्यरितीने शैक्षणिक संवाद साधत होते.आता मात्र या मुलांना अजून वाचनाची गोडी कशी लावावी यासाठी कातकरी भाषेत एक पुढचं पाऊल टाकत बालगोष्टीचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद करण्याचे मोलाचे काम त्याने हाती घेतले.आणि तो कामालाही लागला यामागचे कारण म्हणजे एखादी गोष्ट मुलांना त्यांच्या भाषेत सांगितली तर खूप मनोरंजक वाटते व पक्की लक्षात राहते.त्या वप्रमाणे म्हातारीचा भोपळा,टोपीवाला आणि माकड,ससा कासव अशा गोष्टी कातकरी भाषेत अनुवाद केल्या व त्या मुलांसोबत सादर केल्या.त्यामुळे मूल एवढी खुश होऊ लागली व घरी जाऊन पालकांना सांगू लागली की सर आपल्या भाषेत बोलतात व गोष्टी सांगतात .यामुळे मुलांची उपस्तिथी वाढू लागली व गैरहजर राहणारे मुलं दररोज शाळेत येऊ लागले.मुलांना सतांबद्दल आवड निर्माण होऊ लागली व सरांनाही मुलांचा लळा लागला हे सर्व शक्य झाले फक्त भाषेमुळे.अशा पद्धतीने मुलं शाळेत येऊ लागली व टिकू लागली.
३)मुळाक्षरे कातकरी- मराठी:-
बोलीभाषा गोष्टी संवाद मुळे पहिलीच्या मुलांना शाळेत रमवन्यात यश आले होते आता त्यांना अध्ययनाची गोडी लावायची होती त्यासाठी त्यांना मुळाक्षरे शिकवताना त्यांच्याच परिसरातील प्राण्यांचे,वस्तूंचे नावे त्यांच्याच भाषेत सांगून त्या त्या मुळाक्षरांची ओळख दिली.जसे
क- केल्या(माकड),कोहळ(भोपळा)
ख- खुबे(गोगलगाय)
ग-गोड(गुळ)
अशा प्रकारे ओळख दिल्याने मुलांना जास्त लवकर समजू लागले व याचा प्रवास सोपा होऊ लागला व मुले वाचन लेखन प्रक्रियेत चागला प्रतिसाद देऊ लागले.
४)शाळाबाह्य ते शिष्यवृत्तीधारक:-
सुरवातीच्या काळात मुलांना शाळेत आणण्यासाठी धडपड करावी लागली व कालांतराने बोलीभाषेच्या वापरामुळे मुलांशी जुळवून घेऊन त्यांना शाळेची आवड निर्माण झाला व जे मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते,कोणी शाळाबाहय होते ते शाळेत येऊ लागले टिकू लागले व शिकू लागले,चांगल्याप्रकारे वाचन लेखन करू लागले व व्यक्त होऊ लागले.त्याच प्रमाणे 2012-13,2013-14,2014-15 या कालावधीत तर 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत मुलं चमकू लागले व100% शाळेचा निकाल लागू लागला व काही मुलं शिष्यवृत्ती धारक झाली.हा सर्व बदल एकदम झाला नाही याला सतत सुरु असलेले प्रयत्न होतेच त्याप्रमाणे मुलांमध्ये शिकण्याची जिद्द निर्माण केल्याने हे सर्व शक्य होत गेले.2006 ते 2016 या कालावधीत खूप शिकायला मिळालं व साहित्य निर्मितीत वेगवेगळे प्रयोग करता आले.
५)इयत्ता पहिलीच्या मराठी पुस्तकाचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद:-
जून 2016 ला प्रशासकीय बदली झाली व नवीन जी शाळा मिळाली त्यात एकही कातकरी बोलीभाषिक मुलं नव्हतं त्यामुळे आपण साहित्य निर्मितीचा घेतलेला वसा थांबण्याची भीती होती पण जिद्द सोडली नव्हती.शेवटी प्रशासनाला विनंती केली व सध्याची शाळा संतोषनगर आदिवासीवाडी ही मिळाली .यापुढे एक पाऊल टाकत इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठयपुस्तकाचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद करण्याचे ठरवले जेणेकरून पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांना त्यांच्या भाषेत अध्ययन अनुभव देता येतील.या प्रमाणे पाहिलच्या कविता,गोष्टी,चित्रकथा,संवाद कातकरी भाषेत बनवल्या व त्याची pdf बनवुन whats app च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील शिक्षकापर्यंत पोहचवल्या जेणेकरून त्यांना पहिलीच्या मुलांना शाळेत आनंददायी पद्धतीने रमवता येईल.
६)शिक्षणाची वारी:-
2016 17 च्या शिक्षणाच्या वारीसाठी महाराष्ट्रातील 50 उपक्रमामध्ये त्याच्या या कातकरी बोलीभाषेच्या उपक्रमाची निवड झाली व एका आदिवासी वाडीवरील उपक्रम राज्यस्तरावर पोहचला.या वारीच्या माध्यमातून पुणे,नागपूर,औरंगाबाद येथे जाऊन महाराष्ट्रतील हजारो शिक्षकांना या उपक्रमची गरज का आहे याची माहिती दिली व मुलं कशाप्रकारे स्वभाषेत चांगल्या प्रकारे शिकते याची माहिती दिली. महाराष्ट्रतील विविध आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना हा उपक्रम खूप आवडला व त्या प्रमाणे काही शिक्षकाने पुढील कालावधीत वारली,लमान भाषेत साहित्य बनवले.
कातकरी भाषा ही रायगड,ठाणे,पालघर,पुणे,सातारा जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी असल्याने या बनवलेल्या पुस्तकाची pdf सर्वत्र सोसेल मिडियाच्या माध्यमातून पोहचवली व त्याचा तिथे एक शिक्षक मार्गदर्शिका म्हणून वापर होत असलेचा अभिप्राय येऊ लागले.
अशा प्रकारे प्रत्येक मुलं शिकले पाहिजे यासाठी एक बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे उपक्रम सर्वत्र पोहचला व याचा उपयोग मूल शाळेत येण्यासाठी व टिकण्यासाठी,शिकण्यासाठी होत आहे याचा आनंद वाटत आहे.
स्वतः च्या सहा वर्षाच्या मुलाला गजुने आपल्याच शाळेत शिकायला टाकलेय.आदिवासीच्या मुलांसमवेत तोही त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण घेतोय.
संतोष मुसळे,जालना
मो.नं.९७६३५२१०९४
* दि.२२जुलै २०१८ रोजीच्या #दै_पुण्यनगरी या वर्तमानपत्राच्या '#प्रवाह' या पुरवणीतील शिक्षणाची बेट शैक्षणिक कार्याविषयीचा 'बोलीभाषेतून शिक्षणाची गोडी या लेखातून #श्री_संतोष_मुसळे(जालना) सरांनी माझ्या 12 वर्ष शैक्षणिक कार्याचा घेतलेला आढावा
बोलीभाषेतून शिक्षणाची गोडी लावणारा!
निसर्गान भरभरुन सौंदर्य दिलेला कोकणचा परिसर सर्वांनाच आवडतो.उंच उंच सह्याद्रीच्या डोंगररांगा,सतत रिमझिम पडणारा पाऊस,दुधासारखे फेसाळणारे धबधबे,कौलारु घरे,धानाची शेती,आंबे,काजुची झाडे हे निसर्गरम्य व मनमोहक दृश्य पाहिले की मन प्रसन्न होते.मात्र उंचसखल भागात मोठ्या जिकरीने व हिरीरीने निसर्गासारख्याच शाळा उभारुन छोटी छोटी शिक्षणाची बेट तयार करतायेत यापैकीच एक पाले खुर्द ता.रोहा जि.रायगड येथील गजानन जाधव यांना आज भेटूयात.
*लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव* येथील राहणारा गजानन लहानपणापासून मराठवाड्यात पडणारा सततचा दुष्काळ तो बघत आलाय.याच दुष्काळाच्या सावटाखाली शिक्षणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.कारण पावसाअभावी शेतीत काहीच पिकायचे नाही.आयुष्यात शिकून खुप मोठे व्हायचे होते मात्र परिस्थितीने त्याला डी.एड. करायला लावले.त्याची आई नेहमी सांगायची गजानन जे काही काम करशील ते मनापासून व अपेक्षाविरहीत कर.
डी.एड.झाल्यानंतर २००६ साली रायगड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नौकरीस तो रुजू झाला.मनात खुप सारी स्वप्नांची खुणगाठ बांधून तो शाळेवर जाण्यास उत्सुक होता.त्याला रोहा तालुक्यातील पाले खुर्द आदिवासीवाडी ही शाळा त्याला मिळाली.समुद्रसपाटीपासून साधारण २ किलोमीटर डोंगराच्या कडेला वसलेला छोटासा आदिवासी पाडा व तेथील छोटीशी टुमदार शाळा एकदाची त्याच्या नजरेस पडली.पाड्यावर जायला कच्चा रस्ता असल्याने पायीच चालत जावे लागायचे.पाड्यावर गेल्यावर निदर्शनास आले की येथील संपूर्ण वस्ती ही कातकरी आदिवासी समुदायाची . सुरवातीच्या कळात गजाननला त्यांची भाषा व त्यांना गजाननची भाषा समजतच नव्हती म्हणून गजाननला भीती वाटायची. कारण या आगोदर फक्त पुस्तकात कातकरी आदिवासी जमाती विषयी ऐकले होते त्यांचे राहणीमान,जीवनशैली अगदी वेगळी ,गरजे पुरते कपडे व कमरेला सतत एक कोयता असतो हे चित्र पुस्तकातून पाहिले होते.मात्र जसेजसे दिवस लोटले जावू लागले नंतर हळू हळू या समुदायाविषयीची भीती कमी झाली.
आपली नेमणूक येथील मुलांना शिकविण्यासाठी झालेली आहे हे गजू जाणून होता.आता त्याने मोर्चा आदिवासीच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल याकडे वळवला.घरोघरी भेटी घेवून पालकांची मानसिकता बदलली. सुरवातीच्या काळात म्हणजेच २००६ते २००९या कालावधीत मुलांसोबत राहून,पालका सोबत मिसळून कातकरी समुदायबद्दल बरीच माहिती त्याने मिळवली होती.पण मूळ प्रश्न होता भाषेचा कारण सर्व वस्तीत कातकरी बोलीभाषा बोलली जायची व तोस मराठी बोलीभाषिक असल्यामुळे शाळेतील विध्यार्थी व त्याच्यात संवाद साधताना गोंधळ उडून जायचा.कारण ते जास्तीतजास्त कातकरी भाषेत संवाद साधायचे व ते त्याला समजायचे नाही.
आता मुलासोबत राहून आपन त्यांची भाषा शिकायला हवी असे गजूने ठरविले.कालांतराने मुलांमध्ये राहुन त्याचे ऐकून कांही शब्द समजू लागले जसे मुलगा-सोहरा,मुलगी-सोहरी,वडील-बाहस, आई-बय अशा प्रकारे त्यांचे हे शब्द ऐकून थोडी कातकरी बोलिभाषा तो समजू लागला व कालांतराने मुलांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधू लागला.गुरुजी आपल्या भाषेत बोलतात हे बघून मुलांनाही छान वाटू लागले त्यामुळे मुलं माझ्या अधिक जवळ येऊ लागली.सामान्यपणे राज्याच्या शिक्षणाची विभागणी करावयाची झाल्यास शहरी,ग्रामीण व आदिवासी अशी करावी लागेल.प्रमाण मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके शहरी भागातील व ग्रामीण भागातील मुलांना सहज समजतात मात्र आदिवासी भागात प्रमाण भाषा अजिबातच समजत नाही व यातूनच ती मूले शाळेच्या प्रवाहाबाहेर जातात.यामागील कारण म्हणजे त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण दिल्यास ती मुल नक्कीच शिक्षणप्रवाहात कायम राहतील आणि हेच गजाननने कातकरी बोलीभाषेत साहित्य निर्मिती करुन साध्य केलेय.
उपक्रम:
१)कातकरी-मराठी शब्दसंग्रह :-
आदिवासी पाड्यावरील मुलांंमध्ये राहून बऱ्यापैकी कातकरी भाषेची ओळख त्यांना झाली होती.मग मुलांच्या भावविश्वातील ,परिसरातील,कुटुंबातील तसेच प्राण्यांचे ,पक्षांचे कातकरी बोलीभाषेतील शब्द व त्याचा मराठीत अर्थ अशा १०० शब्दाचा संग्रहत्याने बनवला. जसे फुलपाखरू-भिंगरूट,अंडी-साकु, म्हातारा-डवर, म्हातारी-डोसी अशा दररोज बोलल्या जाणाऱ्या शब्दांचा यात समावेश होता.आता मुलेही सरांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधू लागली व एकूणच शिक्षणाची गाडी रुळावर यायला लागली.या शब्दसंग्रहाचा फायदा म रायगड जिल्ह्यातील अनेक कातकरी वस्तीवर काम करणाऱ्या शिक्षकांना झाला.कारण ज्याप्रकारे भाषेची अडचण गजाननला येत होती तशीच इतरांनाही येत होती .यामुळे कातकरी बोलीभाषेत साहित्य निर्मितीची अधिक गरज ओळखुन पुढील प्रवास सुरु ठेवला.
२)बालगोष्टी कातकरी-मराठी:-
कातकरी भाषेतील शबादसंग्रहाचा साठा गजाननकडे बऱ्यापैकी झाला होता.पाड्यावरील मुले व तो योग्यरितीने शैक्षणिक संवाद साधत होते.आता मात्र या मुलांना अजून वाचनाची गोडी कशी लावावी यासाठी कातकरी भाषेत एक पुढचं पाऊल टाकत बालगोष्टीचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद करण्याचे मोलाचे काम त्याने हाती घेतले.आणि तो कामालाही लागला यामागचे कारण म्हणजे एखादी गोष्ट मुलांना त्यांच्या भाषेत सांगितली तर खूप मनोरंजक वाटते व पक्की लक्षात राहते.त्या वप्रमाणे म्हातारीचा भोपळा,टोपीवाला आणि माकड,ससा कासव अशा गोष्टी कातकरी भाषेत अनुवाद केल्या व त्या मुलांसोबत सादर केल्या.त्यामुळे मूल एवढी खुश होऊ लागली व घरी जाऊन पालकांना सांगू लागली की सर आपल्या भाषेत बोलतात व गोष्टी सांगतात .यामुळे मुलांची उपस्तिथी वाढू लागली व गैरहजर राहणारे मुलं दररोज शाळेत येऊ लागले.मुलांना सतांबद्दल आवड निर्माण होऊ लागली व सरांनाही मुलांचा लळा लागला हे सर्व शक्य झाले फक्त भाषेमुळे.अशा पद्धतीने मुलं शाळेत येऊ लागली व टिकू लागली.
३)मुळाक्षरे कातकरी- मराठी:-
बोलीभाषा गोष्टी संवाद मुळे पहिलीच्या मुलांना शाळेत रमवन्यात यश आले होते आता त्यांना अध्ययनाची गोडी लावायची होती त्यासाठी त्यांना मुळाक्षरे शिकवताना त्यांच्याच परिसरातील प्राण्यांचे,वस्तूंचे नावे त्यांच्याच भाषेत सांगून त्या त्या मुळाक्षरांची ओळख दिली.जसे
क- केल्या(माकड),कोहळ(भोपळा)
ख- खुबे(गोगलगाय)
ग-गोड(गुळ)
अशा प्रकारे ओळख दिल्याने मुलांना जास्त लवकर समजू लागले व याचा प्रवास सोपा होऊ लागला व मुले वाचन लेखन प्रक्रियेत चागला प्रतिसाद देऊ लागले.
४)शाळाबाह्य ते शिष्यवृत्तीधारक:-
सुरवातीच्या काळात मुलांना शाळेत आणण्यासाठी धडपड करावी लागली व कालांतराने बोलीभाषेच्या वापरामुळे मुलांशी जुळवून घेऊन त्यांना शाळेची आवड निर्माण झाला व जे मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते,कोणी शाळाबाहय होते ते शाळेत येऊ लागले टिकू लागले व शिकू लागले,चांगल्याप्रकारे वाचन लेखन करू लागले व व्यक्त होऊ लागले.त्याच प्रमाणे 2012-13,2013-14,2014-15 या कालावधीत तर 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत मुलं चमकू लागले व100% शाळेचा निकाल लागू लागला व काही मुलं शिष्यवृत्ती धारक झाली.हा सर्व बदल एकदम झाला नाही याला सतत सुरु असलेले प्रयत्न होतेच त्याप्रमाणे मुलांमध्ये शिकण्याची जिद्द निर्माण केल्याने हे सर्व शक्य होत गेले.2006 ते 2016 या कालावधीत खूप शिकायला मिळालं व साहित्य निर्मितीत वेगवेगळे प्रयोग करता आले.
५)इयत्ता पहिलीच्या मराठी पुस्तकाचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद:-
जून 2016 ला प्रशासकीय बदली झाली व नवीन जी शाळा मिळाली त्यात एकही कातकरी बोलीभाषिक मुलं नव्हतं त्यामुळे आपण साहित्य निर्मितीचा घेतलेला वसा थांबण्याची भीती होती पण जिद्द सोडली नव्हती.शेवटी प्रशासनाला विनंती केली व सध्याची शाळा संतोषनगर आदिवासीवाडी ही मिळाली .यापुढे एक पाऊल टाकत इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठयपुस्तकाचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद करण्याचे ठरवले जेणेकरून पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांना त्यांच्या भाषेत अध्ययन अनुभव देता येतील.या प्रमाणे पाहिलच्या कविता,गोष्टी,चित्रकथा,संवाद कातकरी भाषेत बनवल्या व त्याची pdf बनवुन whats app च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील शिक्षकापर्यंत पोहचवल्या जेणेकरून त्यांना पहिलीच्या मुलांना शाळेत आनंददायी पद्धतीने रमवता येईल.
६)शिक्षणाची वारी:-
2016 17 च्या शिक्षणाच्या वारीसाठी महाराष्ट्रातील 50 उपक्रमामध्ये त्याच्या या कातकरी बोलीभाषेच्या उपक्रमाची निवड झाली व एका आदिवासी वाडीवरील उपक्रम राज्यस्तरावर पोहचला.या वारीच्या माध्यमातून पुणे,नागपूर,औरंगाबाद येथे जाऊन महाराष्ट्रतील हजारो शिक्षकांना या उपक्रमची गरज का आहे याची माहिती दिली व मुलं कशाप्रकारे स्वभाषेत चांगल्या प्रकारे शिकते याची माहिती दिली. महाराष्ट्रतील विविध आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना हा उपक्रम खूप आवडला व त्या प्रमाणे काही शिक्षकाने पुढील कालावधीत वारली,लमान भाषेत साहित्य बनवले.
कातकरी भाषा ही रायगड,ठाणे,पालघर,पुणे,सातारा जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी असल्याने या बनवलेल्या पुस्तकाची pdf सर्वत्र सोसेल मिडियाच्या माध्यमातून पोहचवली व त्याचा तिथे एक शिक्षक मार्गदर्शिका म्हणून वापर होत असलेचा अभिप्राय येऊ लागले.
अशा प्रकारे प्रत्येक मुलं शिकले पाहिजे यासाठी एक बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे उपक्रम सर्वत्र पोहचला व याचा उपयोग मूल शाळेत येण्यासाठी व टिकण्यासाठी,शिकण्यासाठी होत आहे याचा आनंद वाटत आहे.
स्वतः च्या सहा वर्षाच्या मुलाला गजुने आपल्याच शाळेत शिकायला टाकलेय.आदिवासीच्या मुलांसमवेत तोही त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण घेतोय.
संतोष मुसळे,जालना
मो.नं.९७६३५२१०९४










